राज्यपाल केंद्र, राज्यातील महत्त्वाचा दुवा - राष्ट्रपती रामनाथ कोविंद

नवी दिल्ली - केंद्र आणि राज्यांत योग्य समतोल राखण्यासाठी राज्यपाल आणि उप राज्यपाल यांची भूमिका महत्त्वाची असते, असे प्रतिपादन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केले. राज्यपाल आणि उप राज्यपाल यांचे ५० वे संमेलन नवी दिल्लीत पार पडले. त्यावेळी राष्ट्रपती कोविंद बोलत होते. या कार्यक्रमाला देशातील राज्यपाल, उप राज्यपालांसह उप राष्ट्रपती बैंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीयमंत्री अमित शहा उपस्थित होते. महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीसंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावत शपथविधीबाबतची कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, दरम्यान, राज्यपाल कद्र आणि राज्यातील समतोलाचा महत्त्वाचा दुवा असतो. भारताच्या संघराज्यीय घटनेत गाय राज्यपालांचे पद सवांत महत्त्वाचे आहे, केंद्र आणि राज्यांतील समन्वय उत्तम राहावा, यासाठी राज्यपाल आणि उप राज्यपाल यासाठी राज्यपाल आणि उप राज्यपाल यांची भूमिका अत्यंत महत्वाची असते, मी असे राष्ट्रपतींनी नमूद केले. २६ नोव्हेंबर रोजी 'भारतीय संविधाना'ला ७० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने देशातील नागरिकांना आपली निसिनाने देशातील नागरिकांना आपली मूलभूत हक्के आणि कर्तव्ये याची माहिती व्हावी, यासाठी जागरूकता अभियान सुरू करण्यात येईल, अशी माहितीही राष्ट्रपतींनी यावेळी दिली. देशातील सर्व राजभवनात हा कार्यक्रम उत्साहात पार पाडला जाईल, अशी आशा व्यक्त करत या मोहिमेत राज्यपालांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, अशी सचनाही त्यांनी यावेळी केली. राजभवनांच्या सुधारणांवर भर देत सामान्य नागरिकांना सहज प्रवेश मिळण्याबाबत लक्ष केंद्रीय करावे. राजभवन हे सर्वांसाठी खुले नाही, अशी जनभावना बदलण्यासाठी खले नाही. अशी जनभावन राज्यपालांनी पुढाकार घ्यायला हवा, असेही राष्ट्रपती यांनी सांगितले.